प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह
१.जैन धर्म, २. बौद्ध धर्म, ३. ज्यू धर्म, ४ ख्रिश्चन धर्म, ५ इस्लाम धर्म, ६ पारशी धर्म
१.जैन धर्म
धर्मात 'अहिंसा' या तत्त्वाला महत्त्व दिलेले आहे.
विकारांवर विजय मिळवणे
'जिन' म्हणजे 'जिंकणारा'.
'जिन' या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो.
धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन तीर्थंकर म्हणतात, जैन परंपरेत एकूण २४ तीर्थंकर होऊन गेले.
वर्धमान महावीर (इ.स.पू. ५९९ ते इ.स.पू. ५२७) :
पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला.
वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील चोविसावे तीर्थंकर
जन्म :
बिहार राज्यामध्ये प्राचीन काळच्या वृज्जी नावाचे महाजनपदची राजधानी वैशाली नगराचा एक भाग कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला.
ज्ञानप्राप्ती :
वर्धमान महावीरांनी मिळालेले ज्ञान 'केवल' म्हणजे 'विशुद्ध' स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना 'केवली' असे म्हटले जाते.
विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते.
धर्मप्रसार :
लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे तीस वर्षे उपदेश केला.
भाषा :
वर्धमान महावीर 'अर्धमागधी' या लोकभाषेतून लोकांना उपदेश करत.
समवसरण :
लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत, त्यांना 'समवसरण' असे म्हणत असत.
धर्माची शिकवण :
जैन धर्म हा शुद्ध आचरणावर भर देतो. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो.
शुद्ध आचरणासाठी वर्धमान महावीरांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांमध्ये सामावलेले आहे.
पंचमहाव्रते -
अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे पाच नियम :
१.अहिंसा, २.सत्य, ३.अस्तेय, ४.अपरिग्रह, ५.ब्रह्मचर्य.
१. अहिंसा :
कोणत्याही जीवाची हिंसा होईल, किंवा दुखापत होईल असे वागू नये.
२. सत्य :
प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी.
३. अस्तेय :
'स्तेय' म्हणजे चोरी. चोरी न करणे, म्हणजे अस्तेय. दुसऱ्याच्या मालकीच किंवा हक्काच त्याच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी.
४. अपरिग्रह :
मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा न करणे, म्हणजे अपरिग्रह.
५. ब्रह्मचर्य :
शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य.
त्रिरत्ने :
१. 'सम्यक् दर्शन', २. 'सम्यक् ज्ञान' आणि ३. 'सम्यक् चारित्र'
सम्यक् याचा अर्थ 'संतुलित'
१. सम्यक् दर्शन :
तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे.
२. सम्यक् ज्ञान :
तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून, त्याचा सखोल अर्थ समजून घेणे.
३. सम्यक् चारित्र :
पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे.
२ बौद्ध धर्म
बौद्ध धर्माचे संस्थापक : गौतम बुद्ध
गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३ ते इ.स.पू. ४८३) :
गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. पित्याचे नाव शुद्धोदन आणि आईचे नाव मायादेवी.
गौतम बुद्धांचे मूळ नाव : सिद्धार्थ.
एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळील 'ऊरुवेला' या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ अवस्थेत त्यांना 'बोधि' प्राप्त झाली.
'बोधि' म्हणजे सर्वोच्च ज्ञान.
गौतम बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना 'बुद्ध' असे म्हटले गेले.
पिंपळाच्या वृक्षाला आता 'बोधिवृक्ष' असे म्हणतात.
'ऊरुवेला' या स्थानाला 'बोधगया' असे म्हणतात.
गौतम बुद्धांनी आपला उपदेश 'पाली' या लोकभाषेत केला.
गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन वाराणसीजवळ 'सारनाथ' येथे दिले. या प्रवचनात जो उपदेश केला, त्यास 'धम्म' असे म्हटले जाते. या प्रवचनाद्वारे धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला पाली भाषेत 'धम्मचक्कपवत्तन' असे म्हटले जाते.
गौतम बुद्धांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे पंचेचाळीस वर्षे 'चारिका' केली. चारिका म्हणजे पायी फिरणे.
'त्रिशरण':
बौद्ध धम्मामध्ये 'बुद्ध' 'धम्म' आणि 'संघ' यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला 'त्रिशरण' असे म्हणतात.
बौद्ध संघ :
धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला.
गृहस्थ जीवनाचा ते त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना 'भिक्खू' असे म्हटले जाते.
स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता. त्यांना 'भिक्खुनी' असे म्हणतात.
धम्माचे सार पुढीलप्रमाणे :
आर्यसत्ये :
मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्ये आहेत. त्यांना आर्यसत्ये म्हटलेले आहे.
१. दुःख : मानवी जीवनात दुःख
२. दुःखाचे कारण : दुःखाला कारण असते.
३. दुःख-निवारण : दुःख दूर करता येते.
४. प्रतिपद : प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे.
पंचशील :
गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांनाच 'पंचशील' असे म्हणतात.
१. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे.
२. चोरी करण्यापासून दूर राहणे.
३. अनैतिक आचरणापासून दूर राहणे.
४. असत्य बोलण्यापासून दूर राहणे.
५. मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे.
अष्टांगिक मार्ग :
प्रतिपद म्हणजे दुःखाचा अंत करण्यार्या शुद्ध आचरणाच्या मार्गाला 'अष्टांगिक मार्ग' असे म्हटले आहे.
१. सम्यक् दृष्टी : चार आर्यसत्यांचे ज्ञान होय.
२. सम्यक् संकल्प : हिंसा वगैरे तत्त्वांचा त्याग होय.
३. सम्यक् वाचा : असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे.
४. सम्यक् कर्मान्तः प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे.
५. सम्यक् आजीव : उपजीविका गैर मार्गाने न करता योग्य मार्गाने करणे.
६. सम्यक् व्यायाम : व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय.
७. सम्यक् स्मृती : मन एकाग्र करून विकारांना दूर करणे आणि आपले चित्त योग्य रीतीने समजून घेणे.
८. सम्यक् समाधी : चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे.
३ ज्यू धर्म
भारतात प्रचार :
इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात केरळमधील कोचीन.
ज्यू धर्माला 'यहुदी' धर्म असेही म्हटले जाते.
तत्व :
देव एकच आहे, असे ज्यू धर्मीय मानतात,
शिकवण :
ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे.
प्रार्थनास्थळ : 'सिनॅगॉग'
४ ख्रिश्चन धर्म
स्थापनाक : येशू ख्रिस्त
येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते.
भारतात प्रचार :
१२ शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस.
केरळ राज्यातील त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन ५२ मध्ये चर्चची स्थापना केली.
पवित्र धर्मग्रंथ : 'बायबल'
प्रार्थनास्थळ : 'चर्च'
ख्रिश्चन धर्माची शिकवण :
देव एकच आहे, तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे.
आपण सारे एकमेकांचे बंधुभगिनी आहोत.
आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील.
चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे.
५. इस्लाम धर्म :
भारतात प्रसार :
इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतात केरळच्या किनाऱ्यावर इस्लामचे आगमन झाले.
संस्थापक : मुहम्मद पैगंबर
पवित्र धर्मग्रंथ : पवित्र कुरआन
धर्माची शिकवण :
इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे.
अल्ला एकच असून मुहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत.
सर्वकाळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे,
तो सर्वशक्तिमान आणि परम दयाळू आहे,
मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे,
प्रार्थनास्थळ : 'मशीद'
६. पारशी धर्म
पारशी लोक इराणच्या ‘पार्स' किंवा 'फार्स' नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना 'पारशी' या नावाने ओळखले जाते.
संस्थापक : झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक.
देवाचे नाव : 'अहुर मज्दू'
पवित्र ग्रंथ : 'अवेस्ता'
प्रार्थना स्थळ : ‘अग्यारी'
तीन प्रमुख आचरणतत्त्वे :
उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती.
पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्त्वांना अत्यंत महत्त्व आहे.
त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो.