सामाजिक व राजकीय चळवळी
‘चळवळी’ का?
1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी
होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे
शक्य असतेच असे नाही.
2 काही लोक एखाद्याच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्या प्रश्नाचा
पाठपुरावा करतात.
3 त्याच्या निराकरणासाठी लोकांना संघटित करून
शासनावर एखादी कृती करण्यासाठी दबाव
आणण्याचा प्रयत्न करतात.
चळवळ म्हणजे काय ?
सातत्याने कृतिशील राहून त्या समस्येबाबत जनमत तयार करून राजकीय पक्ष
व सरकारवर दबाव आणण्याचे काम केले जाते. या सामूहिक कृतींना ‘चळवळ’ असे
म्हणतात.
उदा., प्रदूषण हा एकच प्रश्न घेऊन चळवळ उभी राहू शकते.
चळवळीची
वैशिष्ट्ये
१ चळवळ ही एक सामूहिक कृती असते. त्यात अनेक
लोकांचा सक्रिय सहभाग असतो.
२ चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण
झालेले संघटन असते.
३ चळवळीसमोर एखादा निश्चित सार्वजनिक हेतू
अथवा प्रश्न असतो. उदा. भ्रष्टाचारविरोधी चळवळीचा
हेतू भ्रष्टाचार नष्ट करण्याचा असतो.
४ चळवळीला नेतृत्व असते. नेतृत्वामुळे चळवळ
क्रियाशील राहते.
५ चळवळींच्या संघटना असतात. त्या संघटना सातत्याने प्रश्नांचा
पाठपुरावा करतात.
६ चळवळचा प्रश्न जनतेला आपला वाटला पाहिजे. तरच जनतेच पाठींबा मिळतो.
७ चळवळींमागे एक व्यापक
विचारसरणी असते, त्यासाठी निश्चित कार्यक्रम ठरवला जातो त्याआधारे चळवळीला
जनमत प्राप्त होते.
चळवळीचे फायदे:
१ सामूहिक कृती हा चळवळीचा गाभा असतो. लोकशाहीमध्ये चळवळींना फार
महत्त्व असते.
२ चळवळींतून अनेक सार्वजनिक प्रश्न चर्चेत येतात.
३ चळवळींतून अनेक सार्वजनिक प्रश्नांची दखल शासन घेते.
४ चळवळींतील नेते व कार्यकर्ते शासनाला सार्वजनिक प्रश्नाच्या
संदर्भात आवश्यक माहिती पुरवतात.
५ शासनाला धोरण आखताना अशा सार्वजनिक प्रश्नाच्या माहितीचा उपयोग
होतो.
६ जनता शासनाच्या काही निर्णयांना अथवा धोरणांना चळवळीच्या मार्फत विरोध करतात.
७ शासनाच्या काही निर्णयांना अथवा धोरणांना अत्यंत संयमाने व
जबाबदारीने निषेध अथवा प्रतिकार करण्याचा हक्क (Right to protest) हा लोकशाहीतील एक महत्त्वाचा हक्क जनतेला आहे.
भारतातील प्रमुख चळवळी
१ स्वातंत्र्यपूर्व
काळात ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीवर
उदरनिर्वाह करण्याच्या
हक्कावर गदा आणली.
२ छोटा
नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील
गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी, बिहारमधील
संथाळ, मंुडा आदिवासींनी
मोठ्या प्रमाणात उठाव केले.
३ भारतातील
आदिवासींचा प्रमुख प्रश्न म्हणजे त्यांचा वनावरील
अधिकार नाकारला जातो.
४ आदिवासी चळवळीची
प्रमुख मागण्या:
आदिवासींचे वनावरील
अधिकार मान्य करावा.
वनातील
उत्पादने गोळा करण्याचा अधिकार त्यांना मिळावा.
वनजमिनीवर
लागवड करण्याचा अधिकार त्यांना मिळावा.
भारतातील शेतकरी चळवळ:
1 ब्रिटिशांच्या राजवटीत सरकारच्या
शेतीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांनी बारडोली,
चंपारण्य, खोतीचा
प्रश्न या चळवळी केल्या.
२ शेतकरी चळवळींच्या प्रेरणा महात्मा फुले, न्यायमूर्ती
रानडे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधून घेतल्या जतात.
3 शेतीविषयक काही सुधारणांमुळे (उदा. कूळकायदा, कसेल
त्याची जमीन इत्यादी.) शेतकरी चळवळ संथ राहिली, मात्र हरितक्रांतीनंतर शेतकरी चळवळ
अधिक क्रियाशील आणि परिणामकारक झाल्या.
४ शेतकरी संघटनांच्या प्रमुख
मागण्या:
शेतमालाला योग्य भाव मिळावा,
शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा,
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी
स्वीकाराव्यात,
कर्जमाफी,
कर्जमुक्ती करावी,
राष्ट्रीय शेतीविषयक धोरण ठरवावे.
भारतातील काही महत्त्वाच्या
शेतकऱ्यांच्या संघटना
शेतकरी संघटना, भारतीय किसान युनियन, ऑल
इंडिया किसान सभा
5 शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत
स्वयंपूर्ण होण्यासाठी हरितक्रांती
करण्यात आली, परंतु
त्याचा गरीब शेतकऱ्यांना फायदा झाला नाही.
6 शेतकऱ्यांमध्ये गरीब आणि श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले. त्यांच्यातील
असंतोष वाढला व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली.
१ एकोणिसाव्या
शतकाच्या उत्तरार्धात भारतात कापड गिरण्या, रेल्वे
कंपन्या यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली
होती.
२ १८९९
मध्ये रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप केला.
३ १९२०
मध्ये कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी
‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’ या नावाची व्यापक
संघटना स्थापन झाली.
४ स्वातंत्र्योत्तर
काळात कामगार चळवळ अधिक प्रभावीपणे काम करू लागली.
५ १९६०
आणि ७० च्या दशकात कामगार चळवळीची अनेक आंदोलने झाली.
परंतु १९८० पासून कामगार चळवळ विखुरली गेली.
६ जागतिकीकरणाचा
परिणाम कामगार चळवळीवर झाला.
७ कामगारांच्या
मागण्या:
अस्थिर
रोजगार, कंत्राटी कामगार, आर्थिक
असुरक्षितता, कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे,
अमर्याद
कामाचे तास,
कामाच्या
ठिकाणी असणारी असुरक्षितता आणि अनारोग्य
स्त्री चळवळ :
१ स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात स्त्रियांवर
होणारा अन्याय, त्यांचे शोषण थांबून त्यांना
सन्मानाने जगता यावे व सार्वजनिक जीवनात सहभाग
घेता यावा यासाठी अनेक सुधारणा चळवळी सुरू
झाल्या.
२ ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, महात्मा
जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता
रमाबाई, रमाबाई रानडे इत्यादी समाजसुधारकांनी कार्य केले.
३ समाजसुधारकांच्या पुढाकारामुळे सतीच्या प्रथेला विरोध, विधवा
पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाहास विरोध, स्त्रियांना
मतदानाचा अधिकार यांसारख्या सुधारणा झाल्या.
४ स्त्रियांना समान वागणूक मिळावी म्हणून स्वातंत्र्यानंतर संविधानात
स्त्रियांना सर्वच बाबतीत समान हक्क देण्यात आले.
५ स्त्री स्वातंत्र्य आणि माणूस म्हणून
दर्जा हे या काळातील स्त्रियांच्या चळवळीचे उद्दिष्ट होते.
६ भारतामध्ये भ्रष्टाचार, जातिव्यवस्थेला विरोध, कट्टर
धार्मिकतेला विरोधया आंदोलनांमध्ये स्त्रिया मोठ्या
प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.
७ स्त्री चळवळीची आव्हाने
स्त्रियांचे आरोग्य,
त्यांची
सामाजिक सुरक्षितता,
त्यांचे
आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरण
स्त्रियांचे
शिक्षण
माणूस म्हणून दर्जा व प्रतिष्ठा मिळावी
पर्यावरण चळवळ:
१ पर्यावरणाचा ऱ्हास ही
आजच्या काळातील एक राष्ट्रीय व
आंतरराष्ट्रीय पातळीवरील गंभीर समस्या आहे.
२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणातील विविध विषयांना प्राधान्य
देत अनेक चळवळी सक्रिय आहेत.
पर्यावरण चळवळ विविध विषय
जैवविविधतेचे संरक्षण,
नद्यांचे प्रदूषण पाण्याच्या विविध स्रोतांचे जतन,
जंगल आवरण व हरितपट्ट्याचे संरक्षण,
रासायनिक द्रव्यांचा वापर व त्यांचे
दुष्परिणाम.
ग्राहक चळवळ :
१ १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहक
चळवळीचा उदय झाला.
२ ग्राहक चळवळीचे उद्दिष्ट व्यापक आहे.
३ जसे भेसळ, वस्तूंची वाढवलेली किंमत, वजन-मापातील
फसवणूक इत्यादी. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी
ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.
‘नवसामाजिक
चळवळी’
१ १९८० नंतरच्या चळवळींना ‘नवसामाजिक चळवळी’ म्हटले जाते. कारण त्यांचे स्वरूप
आधीच्या चळवळींपेक्षा वेगळे होते.
२ त्या अधिक विषयनिष्ठ होऊ लागल्या, म्हणजेच
एकेका विषयाभोवती जनआंदोलन उभे करण्याचे प्रयत्न होऊ लागले.
भारताचे जलपुरुष
१ भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे
डॉ.राजेंद्र सिंह यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून
आणली आहे.
२ राजस्थानमध्ये हजारो ‘जोहड’ (नद्यांवरील मातीचे बंधारे)
निर्माण करण्याच्या माध्यमातून राजेंद्र सिंह प्रसिद्धीस आले होते.
३ सिंह यांनी राजस्थानच्या वाळवंटात नद्या पुनरुज्जीवित केल्या.
त्यांनी ‘तरुण भारत संघ’ या संघटनेची
स्थापना करून शेकडो गावांमध्ये सुमारे
अकरा हजार जोहड निर्माण केले.
४ देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन, नद्या पुनरुज्जीवित करणे, वनसंवर्धन, वन्यजीवन
संवर्धन मोहीम राबवली आहे.
५ गेली ३१ वर्षे त्यांची ही सामाजिक चळवळ
सुरू आहे.
६ डॉ.राजेंद्र सिंह हे पाण्याचे नोबेल
समजल्या जाणाऱ्या ‘स्टाॅकहोम वॉटर प्राइझ’चे मानकरी आहेत