मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२

२. इतिहासलेखन भारतीय परंपरा

 

विषय : इतिहासराज्यशास्त्र

इयत्ता : दहावी

. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

 

. भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल

 

Ø प्राचीन काळातील इतिहासलेखन

Ø मध्ययुगीन काळातील इतिहासलेखन

Ø आधुनिक काळातील इतिहासलेखन आणि ब्रिटिश काळातील इतिहासलेखन

.  भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली

. भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल

 

प्राचीन काळातील इतिहासलेखन

1.   पूर्वजांचे पराक्रम, दैवतपरंपरा, सामाजिक स्थित्यंतरे - मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या.

2.   प्राचीन लिखित साहित्य - धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट शिलालेख इत्यादींवरील कोरीव लेखांच्या स्वरुपात आहेत.

3.   मौर्य सम्राट अशोक - इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकपासून लेखनकला अस्तित्वात होती.

4.   सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत.

 

कोरीव लेखांमुळे महत्त्वाची ऐतिहासिक माहिती:

1.   संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार,  तत्कालीन शासनव्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचनाहवामान, दुष्काळ


इतिहासलेखनाची महत्त्वाची साधने:

1.   धर्मग्रंथ- रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ इत्यादी

2.   परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने 


भारतीय इतिहासलेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे:

राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास

इसवी सनाच्या सातव्या शतकात बाणभट्ट - हर्षचरितहे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथ

सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण

 

सोहगौडा ताम्रपट :

 

 

 

 

 

 

 

 

 

1.   सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश)

2.   मौर्य काळ - ब्राह्मी लीपीत

3.   पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत

4.   (एकावर एक - तीन कमानी) चिन्हे - प्राचीन आहत नाण

5.   चार खांबांवर - दुमजली इमारती - चिन्ह कोठारघरांचे निदर्शक

6.   धान्य जपून वापरण्यात यावे -असा आदेश

7.   दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण - काय काळजी घ्यावी

 

Ø मध्ययुगीन काळातील इतिहासलेखन

बाणभटट – ‘हर्षचरित’ – टिप लिहा

1.   इसवी सनाच्या सातव्या शतकात  बाणभटटाने हाहर्षचरितचरित्रग्रंथ संस्कृत काव्य लिहिले आहे.

2.   या चरित्र ग्रंथात तात्कालिक सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केले आहे.

 

राजतरंगिणी’- कल्हण - टिप लिहा.

1.   इसवी सनाच्या १२व्या शतकात -  कल्हण - राजतरंगिणी - काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ

2.   इतिहासलेखन शास्त्रशुद्ध कसे असावे - आधुनिक संकल्पना

3.   कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा

4.   साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला

 

मुस्लीम अरबी आणि फारसी इतिहासलेखन:

झियाउद्दीन बरनी:

1.   तारीख--फिरुजशाही’ - इतिहासलेखनाचा हेतू स्पष्ट

2.   इतिहासकाराचे कर्तव्यपराक्रमाचे आणि कल्याणकारी धाेरणांचे वर्णन करून संपत नाही तर दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचन

3.   विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभाव

 

अल्बेरूनी:

ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाजजीवन यासंबंधीची माहिती          

परदेशी इतिहासकारांचे भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ:

भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्त्वाची माहिती

परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांतही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने

         हसन निजामी लिखित ताजुल-मासिर,

         मिन्हाज--सिराज लिखित तबाकत--नासिरी,

         याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित तारीख-इमुबारकशाही

अमीर खुस्रो याचे विपुल लेखन,

         तुझुक--तिमुरी हे तैमूरलंग याचे आत्मचरित्र,

       

 इब्न बतूता, अब्दुल रझ्झाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगोस पेस  

 

बादशाह औरंगजेबच्या काळातील इतिहासकार:

1.   ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची हे होते.

2.   मुघल काळातील इतिहास समजण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे.

3.   राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा

4.   वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत

  

तुझुक--बाबरी’:

हे मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र आहे

मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याच्या आत्मचरित्रात समाविष्ट असलेल्या बाबी -

त्याने केलेल्या युद्धांची वर्णने,

त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने,

तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतीरिवाज,

वनस्पतीसृष्टी.

याबाबींची बारकाईने केलेल्या निरीक्षणांची नोंद केली आहे.

  

अबुल फजल - ‘अकबरनामा’:

1.   इतिहासलेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने

2.   अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक संकलन

3.   माहितीच्या विश्वासार्हतेची कसू छाननी

4.   संशोधनपद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी

 

मराठीतील बखरी :

बखर’:

        `बखर` हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.-कारण

1.   शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, यांची वर्णने

2.   थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन

3.   तत्कालीन सामाजिक, धार्मिक, आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते हि वर्णने इतिहास लेखनासाठी पूयुक्त ठरतात

4.   मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत.

 

सभासद बखर’ :

1.   छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली.

2.   छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते.

 

भाऊसाहेबांची बखर’:

पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारितपानिपतची बखरअशीही स्वतंत्र बखर आहे.

 

होळकरांची कैफियत’:

होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते.

 

बखरींचे प्रकार:

चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर

 

गोविंद सखाराम सरदेसाई यांना लोक 'रियासतकार' म्हणून ओळखू लागले. कारण-

गोविंद सखाराम सरदेसाईयांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडांत प्रकाशित केला आहे.

गोविंद सखाराम सरदेसाई यांनीमराठा रियासतप्रकाशित करून मराठी इतिहासलेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली.

त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले, म्हणून समाज त्यांनारियासतकारया नावाने ओळखू लागला.

 

आधुनिक काळातील इतिहासलेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ :

        विसाव्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्त्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली.

 

अलेक्झांडर कनिंगहॅम:

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक,

देखरेखीखाली सरनाथ साची अशा अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले.

प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले लेखन केले.

 

जॉन मार्शल:

याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला.

भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो.

अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखनलेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव

 

भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्रकापर्यंत मागे जाऊ शकतो.-कारण

.भारतीय संस्कृती हि एक जगातील प्राचीन संस्कृती मानली जाते.

.जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला.

.हडप्पा संस्कृती सुमारे पाच हजार वर्षापूर्वीची असावी असे पुरातत्वाने सिद्ध केले

4.म्हणून भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्रकापर्यंत मागे जाऊ शकतो.

 

जेम्स मिल:

हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडियाया ग्रंथाचे तीन खंड १८१७ साली प्रसिद्ध

 ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ.

वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव

भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन

 

माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन:

सन १८४१ मध्ये यांनी हिस्टरी ऑफ इंडियाग्रंथ

माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर (१८१९-१८२७)

 

जेम्स ग्रँट डफ:

भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे.

त्याने हिस्टरी ऑफ मराठाज्हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे तीन खंड.

        भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती

        इतिहासलेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि.  का.  राजवाडे

       

कर्नल टॉड:

        भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती - राजस्थानचा इतिहास

       

विल्यम विल्सन हंटर:

        हिंदुस्थानचा द्‌विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निःपक्षपाती वृत्ती दिसते.

 

भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली

वसाहतवादी इतिहासलेखन : टिप लिहा.

        वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी आणि धोरणाला पोषक होईल असे लेखन

        अभ्यास आणि लेखन- इतिहासकारांमध्ये - ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारक.

        भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे, या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात.

        १९२२ ते १९३७ - केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडियाया ग्रंथाचे पाच खंड

प्राच्यवादी इतिहासलेखन :

        पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल, त्याबद्दल आदर, कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांना प्राच्यवादी अभ्यासक म्हटले जाते.

        भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले त्याला प्रच्यावादी इतिहासलेखन

        संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्य - जननी असणारी एक प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली

        वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास

        प्राच्यविद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध, पूर्वग्रह दुषित भारतीय इतिहासाचे लेखन केले

 

सर विल्यम जोन्स:

        इसवी सन १७८४ मध्ये कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी - प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना

 

फ्रेडरिक मॅक्सम्युलर:

        जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख, संस्कृत भाषा ही इंडो-युरोपीय भाषागटातील अतिप्राचीन शाखा

        संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस

        हितोपदेशया संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद

        सेक्रेड बुक्स ऑफ ईस्टया नावाने ५० खंड संपादित          

        ऋग्वेदाचे संकलन केले ते सहा खंडांमध्ये प्रसिद्ध      

        ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता

प्राच्यविद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केले.

 

राष्ट्रवादी इतिहासलेखन:

एकोणिसाव्या- विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षणपद्धतीमध्ये शिकून

भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे कल

राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पुर्वग्रहदुशीत लेखनाला विरोध केला 

भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न

प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले, असा आक्षेप

भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देण्यासाठी

राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.

 

राष्ट्रवादी इतिहासलेखनकार:

विष्णुशास्त्री चिपळूणकर:

        महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास यांच्यापासून प्रेरणा

        ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला.

 

न्या.महादेव गोविंद रानडे:

        राईज ऑफ मराठा पॉवरया ग्रंथात न्या.महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडल मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रांतील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती, हे त्यांनी प्रतिपादले.

 

राष्ट्रवादी इतिहासकार:

महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, अनंत सदाशिव आळतेकर, रमेशचंद्र मजुमदार, राजेंद्रलाल मिश्र, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णु मिराशी,

 

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान :

इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्पात्तीशास्त्र, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार     म्हणून ओळखले जातात.     

मराठ्यांच्या इतिहासाची साधनेअसे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले. त्यांतील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहे.

‘‘इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि यद्धेु यांच्याच हकिकती नव्हेत’’ असे त्यांचे मत होते.

आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे,अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे,

इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि.का.राजवाडे यांनी पुण्यात जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ

‘‘मानवी इतिहास काल स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे.

7 काल, स्थल व्यक्ती या त्रयीची जी सांगड तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते.’’

 

राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान:

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांनी लिहिलेले इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857’ (१८५७ चेस्वातंत्र्यसमर’) या विशेष महत्त्व आहे.

१८५७ चेस्वातंत्र्यसमरहे पुस्तक १८५७ साली भारतात झालेल्या बंडावर लिहिले.

या पुस्तकातून या बंडाकडे ब्रिटिशांविरुद्ध दिलेला पहिला स्वातंत्र्य संग्राम या दृष्टीने पहिले.

त्यांच्या लेखनामुळे भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा मिळाली.

त्यांच्या राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.

दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.

 

स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासलेखन

एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहासलेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली होती.

स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली.

       

        इतिहासलेखनात प्रामुख्याने तीन नवे वैचारिक प्रवाह आढळतात.

        (१  ) मार्क्सवादी इतिहास

() वंचितांचा (सबऑल्टर्न) इतिहास

() स्त्रीवादी इतिहास.

 

मार्क्सवादी इतिहासलेखन:

मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?

कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले त्यासमार्क्सवादी इतिहासलेखनअसे म्हणतात.

मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनातील मध्यवर्ती विचार आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार केलेला आहे.

मार्क्सवादी इतिहासलेखनाचे महत्त्वाचे सूत्र- प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे.

मार्क्सवादी इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला.

डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचेप्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरीहे पुस्तक मार्क्सवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहे.

 

भारतामध्ये मार्क्सवादी इतिहासकार:

दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे.

 

वंचितांचा (सबऑल्टर्न) इतिहास: टिप लिहा.

वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतूनच झाली,

समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे,’ ही कल्पना - अँटोनिओ ग्रामची - इटालियन तत्त्वज्ञ

वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे साधन मानले

भारतात वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा जोतीराव फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडला

वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान - रणजित गुहा - भारतीय इतिहासकार.

 

वंचितांच्या इतिहासातील फुले-आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट करा :

वंचितांचा इतिहास म्हणजे समाजातील दुर्लक्षित समुहाच्या  लोक परंपराचा  इतिहास होय.

एकोणीसाव्याविसाव्या शतकात महात्मा फुले आंबेडकर वंचितांच्या इतिहासचा विचार आपल्या लेखनात मांडला .

महात्मा फुले - गुलामगिरी - शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून मांडला.

धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले.

भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे.   

भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहासलेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले.

विपुल लेखनापैकीहू वेअर शूद्राजआणि अनटचेबल्स्हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण आहे.

 

स्त्रीवादी इतिहास:

इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते कारण

भारतीय इतिहासलेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे     

भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता.

त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते.

तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते.

 

भारतीय स्त्रीवादी इतिहासलेखन: टिप लिहा.

        स्वतंत्रपूर्व काळात ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, मीरा कोसंबी, अशा भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या

        या लेखनात स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित केले

        स्त्रीवादी लेखनामध्ये शर्मिला रेगे यांचेरायटिंग कास्ट, रायटिंग जेंडरः रिडिंग दलित वुमेन्स् टेस्टिमोनीजयामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे.

        एकोणिसाव्या शतकात पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातिव्यवस्था यांना विरोध करणारे ताराबाई शिंदे यांनी सन १८८८ मध्ये हाय कास्ट हिंदु वुमनहे पुस्तक लिहिले.

        स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांचेक्रॉसिंग थ्रेशोल्डस् फेमिनिस्ट एस्सेज इन सोशल हिस्टरीया पुस्तकात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत.

 

भारतीय स्त्रीवादी इतिहासलेखिका: टिप लिहा.

ताराबाई शिंदे:

        एकोणिसाव्या शतकात पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातिव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले.

        सन १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेलेस्त्रीपुरुष तुलनाहे त्यांचे पुस्तक

        हे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते.

        या पुस्तकात त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नाना वाचा फोडली

 

पंडिता रमाबाई:

सन १८८८ मध्ये हाय कास्ट हिंदु वुमनहे पुस्तक प्रसिद्ध झाले.

भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित केले

महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले.

 

मीरा कोसंबी:

स्त्रीवादी लेखनातक्रॉसिंग थ्रेशोल्डस् फेमिनिस्ट एस्सेज इन सोशल हिस्टरीया पुस्तकात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत.

 

शर्मिला रेगे:

स्त्रीवादी लेखनामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे.

रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर रिडिंग दलित वुमेन्स् टेस्टिमोनीजयामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे.

 

आधुनिक इतिहासलेखनकार आणि संशोधक:

विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय घेता इतिहास लिहिणारे इतिहासकार: सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो..सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्ख करावा लागतो.

 अलीकडच्या काळात .दि.फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहासलेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...